Tuesday, December 29, 2009

बडवे हटाव मोहिमेसाठी पंढरपुरात जिजाऊ ब्रिगेचे धरणे आंदोलन
पंढरपूर 31 Mar, 2004, 1922 hrs IST :
एक एप्रिल रोजी होणाऱ्या चैत्री एकादशी दिवशी विदोही चळवळीने जाहीर केलेल्या धरणे आंदोलनामुळे श्री विठ्ठल मंदिरातून बडवे हटाव प्रश्ान् पुन्हा ढवळून निघणार आहे.

विदोही चळवळीचे नेते भारत पाटणकर , पार्थ पोळके यांनी गेल्या आषाढी यात्रेपासून बडवे हटाव मोहीम सुरू करण्याची घोषणा केली होती. आता या आंदोलनास संभाजी ब्रिगेड आणि जिजाऊ ब्रिगेड यांसारख्या संघटनांच्या पाठिंब्यामुळे समाजातून मोठा प्रतिसाद मिळू लागला आहे. चैत्री एकादशीच्या दिवशी श्रविठ्ठल मंदिराबाहेर सकाळी अकरा ते पाच या वेळेत विदोहीचे राज्यभरातून आलेले निवडक कार्यकतेर् धरणे आंदोलन करणार असून , त्याला संभाजी ब्रिगेड आणि जिजाऊ ब्रिगेड साथ देणार आहे.

दरम्यान , प्रशासनाने आंदोलनर्कत्यांच्या मागण्यांची नोंद घेऊन शासनाला माहिती दिली आहे. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी आंदोलनर्कत्यांनी चैत्री एकादशीचे आंदोलन रद्द करावे , अशी विनंती त्यांना केल्याचे प्रांताधिकारी जगदाळे यांनी या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

चैत्री एकादशीसाठी गावात भाविकांची वर्दळ वाढली असून , उजनी धरणातून सोडलेले पाणी चंदभागेच्या पात्रात आल्याने भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मात्र शहरातील तापमानाने42 अंश सेंटीग्रेडपर्यंत मजल मारल्याने दुपारी रस्त्यावर शुकशुकाट असतो

No comments: